आदर्श नागरिक घडवण्यास अपयशी ठरलेली निधर्मी शिक्षणप्रणाली पालटून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक !

सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत.

नापास शब्दाची भीती आणि गुरुकुलपद्धती !

प्राचीन भारतातील शिक्षणव्यवस्था ही वेदप्रमाणित आणि परिपूर्ण होती. विद्यार्थ्याचे कौशल्य पाहूनच त्याला शिक्षण दिले जाई. प्रत्येक कर्म ईश्‍वरप्राप्तीचे साधन असल्याचे मनावर बिंबल्यामुळे कर्मात कनिष्ठ वा उच्च असा भेद नसे.

राष्ट्रीय शिक्षणाच्या पुनर्रचनेची आवश्यकता !

पूर्वीच्या पाठशाळांमधून उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात वेद, शास्त्रे आणि महाकाव्ये यांसह ज्या ग्रंथांचे अध्ययन अणि अध्यापन केले जात होते, त्याचे विवरण ब्रिटीशकालीन कागदपत्रांमध्ये दिले गेले आहे. लेखा, गणित आणि अनेक प्रकारची शिल्पे यांमधील ज्ञानाचे आदानप्रदान स्वदेशी पद्धतीने केले जात होते.

सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !

पूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते.

गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत.

आनंददायी शिक्षणपद्धत कशी असावी ?

  वर्तमानात अभ्यास करून मुले खरेच आनंदी होत आहेत का ? शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. ‘कधी एकदा शाळा सुटते’, असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. ‘परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला … Read more

मुलांसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक आहे का ?

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक ! पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण आणि नंतर ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण दिले जायचे. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होते.