मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फे-यांतून यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या रूपात यज्ञकार्य करणारे समष्टी रत्न आम्ही गमावले ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्‍वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले; कारण त्यांचा आणि सनातन संस्थेचा अत्यंत घनिष्ट असा संबंध अन् संपर्क होता.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन

अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गवराम काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या ४ रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आला आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

‘मुंबई हाय’ परिसरात ‘अ‍ॅफकॉन्स’ या आस्थापनाकडून तेल विहिरींचे काम करत असलेल्या अरबी समुद्रातील जहाजांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे समुद्रातील ३ जहाजे भरकटली असून त्यांतील ‘बोर्ड हाऊसिंग बार्ज पी ३०५’ हे जहाज बुडाले असून त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी ‘विदर्भस्तरीय ऑनलाईन शिक्षक परिसंवाद’!

नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले. या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

एक पिवळ्या रंगाची चिमणी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आली होती. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर ही चिमणी बसली होती. ‘चिमणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याकडे आकृष्ट झाल्याने हे चैतन्य ग्रहण करण्यासाठी ध्यानमंदिरात आली आहे’, असे जाणवले.