जयपूर, राजस्थान येथील शिवभक्त पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांचा देहत्याग

पू. वीरेंद्र सोनी हे घरी राहूनच भाव-भक्तीने साधना करत. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन करून त्यांना आतून ईश्वराकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांची भगवान शिवावर अचल श्रद्धा होती.

गोव्यातील २५ मंदिरांमध्ये सामूहिक गार्‍हाणे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि विश्वकल्याण यांसाठी गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे.

नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

एका व्यक्तीने स्वतःहून सनातनच्या ग्रंथांविषयी विचारून ग्रंथ घेणे आणि त्या वेळी ‘गुरुदेवच आपल्याला योग्य त्या व्यक्तीकडे घेऊन जात आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे 

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ किती टक्के करतो, याचा अभ्यास होणे महत्त्वाचे ! – सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो.

वर्ष २०२२ मधील शनि ग्रह पालट (शनि ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश) !

‘चैत्र कृष्ण चतुर्दशी (शुक्रवार, २९.४.२०२२) या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी पहाटे ४.५७ पासून सकाळी १०.४५ वाजेपर्यंत आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

सर्वत्र भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनैतिकता, बलात्कार या घटना वाढत आहेत. धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेची साधना करणे, ही काळानुसार साधना असते. त्यामुळे सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना असणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

तमिळनाडूतील हिंदीविरोध योग्य कि अयोग्य ?

७ एप्रिल या दिवशी संसदीय राजभाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी “हिंदी ही इंग्रजीला पर्याय असू शकते आणि हिंदी ही देशातील अधिकृत भाषा असू शकते”, असे विधान केले होते. या विधानाला तमिळनाडूमध्ये राजकीय विरोध झाला. तमिळनाडूतील हा ‘हिंदीविरोध योग्य कि अयोग्य ?’ या विषयी चर्चा करणारे काही अनुभव…