आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. क्षुल्लक कारणांनी १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याच्या या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे.

योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

गरीबात गरीब भारतियालाही आध्यात्मिक दृष्टीकोन माहीत असतात; उदा. ‘जीवनात येणारे दुःख हे प्रारब्धामुळे असून ते भोगून संपवण्यासाठी हा जन्म आहे.’ हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन सहनशीलता पुष्कळ प्रमाणात वाढवतो, सहन करण्याची क्षमता वाढवतो.

व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण आणि तिला लागणार्‍या पापाचे प्रमाण अन् संतांचा देहत्याग

सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.

आत्महत्या करणारा निंदनीय ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, ‘बाबांनो, का जीव देता ? मरण तर ठरलेलेच आहे, मग मुद्दाम मरण का स्वीकारता ?

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

‘प्रतिदिन होणार्‍या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. ‘जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ साधनेने मात करता येते’, असे अध्यात्मशास्त्र सांगते.

आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता अधिक असते. आस्तिक लोक नास्तिकांपेक्षा सरासरी ४ वर्षे अधिक जगतात, असे अमेरिकेतील ‘सोशल सायकॉलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स’ या नियतकालिकात संशोधन प्रकाशित झाले आहे.

आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.

आत्मबळ कसे असावे ?

आत्मबळ कसे असावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना २० वर्षांत कष्ट करून मिळवलेले एका वर्षात गमवावे लागले. अशा कठीण परिस्थितीतही महाराजांचे आत्मबळ दृढ होते.

‘स्मार्टफोन बाजूला सारा तो तुम्हाला उध्वस्त करू शकतो !’ – चेतन भगत यांचे भारतीय तरुणांना जाहीर पत्र

तुमच्यापैकी बहुतांश तरुण तुमच्या ‘स्मार्टफोन’वर ध्वनिचित्रफीत पहाण्यात, खेळ खेळण्यात, तुमच्या मित्राशी गप्पा मारण्यात, सोशल मिडियावर (सामाजिक माध्यमांवर) तुमचे मत व्यक्त करण्यात मग्न असतील.

संस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया !

संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारण या लेखातून आपण समजून घेऊ शकतो. तसेच ‘भाषाणां जननी’ असणार्‍या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.