॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्त होतात.
निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्त होतात.
मन सतत ईश्वरात लावल्याने आणि ईश्वराची अनन्यभक्ती केल्याने भक्त ईश्वराशी सतत जुडलेला रहातो आणि ईश्वरालाच प्राप्त होतो.
आत्म्याचा भाव म्हणजे अंतःकरण. त्यात स्थित ईश्वर अविवेकाने होणार्या चुकीच्या समजांना विवेक आणि बुद्धीने नष्ट करतो.
सर्व कर्मे ईश्वरासाठी करणे, ईश्वराला परम आश्रय मानून आसक्तीरहित होऊन आणि कोणाविषयीही वैरभाव न बाळगता ईश्वराची भक्ती करणे, अशी भक्ती करतो, तो ईश्वराला प्राप्त होतो.
ध्यान, सराव, ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्वरप्राप्ती होते.
शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.
उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.
