
बरायठा (सागर, मध्यप्रदेश) – आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंसमोर लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण अशा विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक समस्येचे मुळापासून निराकरण करायचे असल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. ते येथे युवकांच्या बैठकीला संबोधित करत होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत सागर जिल्ह्यातील बरायठा येथे कथावाचक श्री. मधुसूदन मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. राजकुमार कौशिक यांच्या पुढाकाराने एक बैठक पार पडली. या वेळी २० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदुत्वाच्या क्षेत्रात साहित्य निर्मितीचे सनातन संस्थेचे कार्य मोलाचे !
अभाविपचे श्री. सुशांक भोजक आणि श्री. बघेले म्हणाले, ‘‘कम्युनिस्टांनी त्यांचे विचार पसरवण्यासाठी साहित्याचा पुष्कळ उपयोग केला. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या क्षेत्रात आजच्या काळाला अनुसरून, कुतर्कांना उत्तर देणारे साहित्य अभावानेच सापडते. सनातन संस्थेनेे हे ग्रंथ निर्माण करून मोलाचे कार्य केले आहे.’’
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला