शास्रानुसार शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवणे आणि प्रबोधन करणे याची आज आवश्यकता ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या काळानुरूप उत्सवात पालट केले जात असल्याने उत्सवाचे पावित्र्यच नष्ट होत आहे. डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक म्हणून बसवणे, मूर्तीदान करणे, जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणे यांसारख्या अनेक विकृतींमुळे पावित्र्य भंग होत आहे. या विकृती नष्ट करून शास्रानुसार शाडूमातीची गणेशमूर्ती बसवणे आणि प्रबोधन करणे ही आजच्या उत्सवाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३५ दुर्गप्रेमींनी घेतला.
बदलापूर येथेही ३ धर्मप्रेमींच्या घरी प्रवचन घेण्यात आले. बदलापूर येथील कीर्तनकार श्रीमती चंद्रात्रय यांनी सनातन संस्थेच्या बाजूने प्रतिक्रिया दिली.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला