जेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

जेवतांना बोलू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. जेवतांना बोलल्यामुळे मन बहिर्मुख होते. त्यामुळे आपल्यावरील रज-तमाचा प्रभाव वाढतो; म्हणून मौन व्रत पाळावे. अन्न ग्रहण करता करता भगवंताचे नाम घ्यावे. त्यामुळे त्या अन्नात चैतन्य निर्माण होते.

भाव कसा असावा, हे सांगण्यासाठी सनातनच्या साधिकेचे उदाहरण देणारे पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर !

ज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या वेळी भगवंताप्रती भाव कसा असतो, हे सांगण्यासाठी पू. सुनील चिंचोलकर यांनी दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कवितेचे उदाहरण दिले.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांना आनंदाने तोंड कसे द्यायचे, याचा आदर्श देहत्यागाच्या क्षणापर्यंत सर्वांसमोर ठेवणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच !

देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता

संस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !

आमच्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वर्षे साधना करून निसर्गाशी जवळीक साधली. त्यांनी निसर्गाच्या सहवासात जीवन व्यतीत करून निसर्गाशी एकरूप होऊन नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये उकलून विश्‍वापुढे ज्ञानाचे नवे दालन उघडले.

साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे मायेने काळजी घेणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी !

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले.

गडद रंग आणि फिकट रंग यांच्या संदर्भातील आध्यात्मिक प्रयोग

प्रथम गडद रंगांच्या चौकोनांकडून सर्वांत फिकट रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. नंतर त्या उलट म्हणजे फिकट रंगांच्या चौकोनांकडून गडद रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. असे ४ – ५ वेळा करून काय वाटते, ते अनुभवा.

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाल्याने तेथील जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !

२०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे.

कन्यागत महापर्वकाल !

कन्यागत म्हणजे कन्या राशीमध्ये गेलेला. गुरु ग्रहाने कन्या राशीतून तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंड पुढील ११ वर्षे कोरडे रहाते. १२ वर्षांनंतर गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंडातून जलप्रवाह चालू होतो. या वेळी गंगा नदी कृष्णा आणि वेण्णा या नद्यांना भेटायला येते.