बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.

दत्त जयंती निमित्त ठाणे जिल्ह्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर यांच्या भेटी

ठाणे येथे दत्त जयंती निमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ को-या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो.

दत्त जयंती निमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

दत्त जयंती निमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली.

विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात.

साधकांना आपलेसे करून त्यांच्यासमोर परिपूर्ण सेवेचा आदर्श ठेवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !

‘पू. काकांसमवेत सेवा करतांना त्यांच्यातील भावामुळे बर्‍याचदा आपलीही भावावस्था टिकून रहाते. पू. काकांनी सांगितलेल्या प्रार्थनेमुळे भावजागृती होते. पू. काका प्रार्थना करतांना प्रत्यक्ष प.पू. गुुरुमाऊली समोर असल्याची अनुभूती येते.

सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी काढलेले गौरवोद्गार !

सद्गुरु (सौ.) अंजली यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे. त्यांना महर्षि दैवी प्रवास करायला सांगतात. सनातन धर्म राज्यासाठी त्यांच्याद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळवून घेतात. त्यांच्यामुळे सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद मिळतात आणि आपले कार्य आणखीन सुलभ होते.

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नवीन नोटेतील घटक सात्त्विक नसल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘२ सहस्र रुपये मूल्याची नवीन नोट सात्त्विक नाही. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही, एवढेच नव्हे, तर त्रास होईल’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.