सांप्रत बौद्ध राष्ट्र असूनही भगवान श्रीविष्णूवरील श्रद्धा दर्शवणार्‍या महाभारत आणि रामायण यांतील प्रसंगांवर आधारलेले कंबोडियाचे पारंपरिक ‘अप्सरा नृत्य’ !

महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहायचे. ‘खमेर नावाचे हिंदु साम्राज्य येथे वर्ष ८०२ ते १४२१ पर्यंत होते’, असे म्हटले जाते.

कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्‍वराच्या कृपेने प्रवासातच एका व्यक्तीने साहाय्यासाठी येणे, ही भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती !

बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात क्वालालंपूर येथे काही घंटे थांबावे लागले. तेथून कंबोडियाची राजधानी नोम फेन येथे जायचे होते.

विदेशी व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवलेला सात्त्विक स्पर्श अन् असात्त्विक स्पर्श यांतील भेद !

भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या आणि स्वतः दैवी आकर्षणाने ओतप्रोत असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ यांना पाहून अनेक विदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या बंद डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण आणि काही संतांकडील आपोआप निर्माण झालेल्या विभूती यांतील घटकांचा केलेला अभ्यास

ज्या हवाबंद डब्यात (‘हॉट-पॉट’मध्ये) रवाळ कण निर्माण झाले, त्या डब्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेवण वाढण्यात येत होते. जेवण वाढणार्‍या साधिकेने त्या डब्याचा उपयोग वर्ष २००९ पर्यंत ३ – ४ वर्षे केला होता आणि नंतर काही कारणाने तो डबा उपयोगात आणायचे थांबवले होते.

‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती, अपेक्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारी हानी आणि अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय !

‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात.

प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ५ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. साध्वीजींचे रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर सौ. आरती पुराणिक यांनी त्यांचे पाद्यपूजन आणि औक्षण केले.

गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया !

‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ।’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते.

सप्तलोकांच्या संकल्पनेवर आधारलेले आणि प्रगत स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेले इंडोनेशियातील प्रंबनन् म्हणजेच परब्रह्म मंदिर !

मंदिराचा परिसर पुष्कळ मोठा आहे, तसेच सर्व मंदिरांचा कळस पुष्कळ उंच आहे. विशेष म्हणजे मंदिरांच्या बांधकामात कुठेही सिमेंटचा वापर झालेला दिसत नाही. सगळीकडे ‘इंटरलॉकिंग’ पद्धत आहे. दगड एकमेकांमध्ये विशिष्ट प्रकारे अडकवले आहेत. अशा रचनेमुळे मंदिर सात्त्विक दिसते.

निसर्गाद्वारे मिळणारे दैवी संकेत ओळखता येणार्‍या द्रष्ट्या ऋषींचे कार्य !

संकटकाळी ऋषी ध्यानाद्वारे राज्यावर लक्ष ठेवत होते. ज्ञानी ऋषी ज्या राज्यात आहेत, ते राज्य सुरक्षित आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली मानले जाई.’

भारतियांचे अत्यंत प्रगत प्राचीन जलव्यवस्थापन आणि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य !

जगातील पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण भारतात आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल ? इसवी सन दुस-या शतकात चोल राजा करिकलन यांनी बांधलेला ‘अनईकट्टू’ अथवा इंग्रजी भाषेत ‘ग्रँड अनिकट’ (Grand Anicut) किंवा आजच्या बोली भाषेत ‘कल्लानाई बांध’ हा असून तो गेली १८०० वर्षे वापरात आहे.