सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

‘हिंदू एकता दिंडी’ने अमरावती येथे चेतवले हिंदुत्वाचे स्फुलिंग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमुळे शहरात वीरश्री निर्माण होऊन सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्‍या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.

पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांच्या संदर्भात त्यांनी जे काही वर्तवले, ते अक्षरश: सत्यात उतरले. मला कार्य करण्यासाठी आणखी बळ मिळावे, असा त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करतो !’

जळगाव येथील भव्य हिंदू एकता दिंडी !

जे कुणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होतील, त्यांचा निश्चित उद्धार होईल, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते १९ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त बोलत होते. या दिंडीस एक सहस्राहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.

यवतमाळ येथे दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

हिंदु जनजागृती समिती आयोजित दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन नुकतेच पार पडले. संवैधानिक मार्गाने कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार शहरासह वणी, पुसद, उमरखेड, घाटंजी, कारंजा येथील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या देखाव्याला उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त !

अमरावती येथे झालेल्या परशुराम जयंती शोभायात्रेनंतर पारितोषिक वितरण !