प्रगती करू न शकलेल्यांनी निराश न होता तळमळीने साधना चालू ठेवणे आवश्यक ! – (पू.) श्री. संदीप आळशी
६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्या बर्याच साधकांची प्रगती झाली; कारण त्यांनी त्यांची सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि अहंरहितपणे करायचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये वाईट शक्तींचा त्रास असतांनाही प्रगती करणार्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि त्या खालोखाल समष्टी दायित्व घेणार्या साधकांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.