वजन उचलण्याच्या योग्य पद्धती !

‘दैनंदिन कामे करतांना वा कुठे बाहेर जातांना आपल्याला अनेक प्रकारची वजने उचलावी लागतात. ती उचलतांना आपल्या शरिरावर कळत-नकळत ताण येत असतो. वजन उचलतांना ते चुकीच्या पद्धतीने उचलल्यास शरिराची हानी होऊ शकते.

शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ !

शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात.

आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व

‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.

आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्‍वती नसते. अशा वेळी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल.

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुस-या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे.

हिवाळ्यातील ऋतुचर्या

हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.

शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !

‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.

वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो.

अभ्यंग (मालीश)

संपूर्ण शरिराला अथवा शरिराच्या एखाद्या भागाला तेल लावून चोळणे याला ‘अभ्यंग’ (मालीश) असे म्हणतात. अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.