झोप कधी आणि किती घ्यावी ?
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
‘स्वरोदय शास्त्रा’नुसार चंद्रनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास सूर्यनाडी जागृत होते आणि सूर्यनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास चंद्रनाडी जागृत होते. याचाच प्रत्यय उजव्या कुशीवर झोपल्यावर डावीकडील चंद्रनाडी कार्यरत होणे आणि डाव्या कुशीवर झोपल्यावर उजवीकडील सूर्यनाडी कार्यरत होणे, यांमध्ये दिसून येतो.
झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय.
निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे.