रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

 

१. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल !

‘आश्रमात आल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांती जाणवली आणि आतून पुष्कळ चांगले वाटले. मला एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळत गेली. आश्रम स्वतःच अध्यात्माचे एक ज्ञानकेंद्र आहे. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल.’

– अधिवक्ता आलोक तिवारी (उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्तानी सेवा समिती), उत्तरप्रदेश. (१३.६.२०२२)

२. आश्रमात आल्यावर ‘आपण साक्षात् नारायणाच्या धामात पोचलो आहोत’, असे जाणवले !

‘आश्रम पाहून माझे मन भावविभोर झाले. जणूकाही ‘आपण साक्षात् नारायणाच्या धामात पोचलो आहोत’, असे मला जाणवले. ‘आश्रमात असेच चांगले कार्य उत्तरोत्तर होत रहावे, ज्यामुळे आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल’, अशी देवाचरणी प्रार्थना !’

– सौ. बीना ठाकूर, जिल्हा मंडला, मध्यप्रदेश. (१४.६.२०२२)

३. आश्रम पाहून मला आपला महान धर्म अणि संस्कृती यांचा अभिमान वाटला !

‘आश्रम पाहून मला आपला महान धर्म अणि संस्कृती यांचा अभिमान वाटला. आश्रम अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि सुव्यवस्थित आहे. आश्रमातील साधकांचे आचरण अत्यंत आत्मीयतेचे आहे. त्यांची गुरुनिष्ठा पाहून मनाला प्रसन्न वाटले. येथे ईश्वराची कृपा प्रत्यक्षात साकार झाल्याचे मला दिसले.’

– डॉ. सत्यमेव जयते (संस्थापक, सत्यमेव जयते), उत्तरप्रदेश

४. ‘या वर्षी आश्रम पहातांना माझ्या आनंदात वृद्धी झाली. ‘आश्रमाची सात्त्विकताही वाढली आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. धर्मेंद्र सिंह ठाकूर (प्रदेश महासचिव, हिंदु सेवा परिषद), मध्यप्रदेश (४.६.२०२२)

५. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने सर्वांचा विश्वास संपादन केला आहे.’

– श्री. शंकर खराल (केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ नेपाळ राष्ट्रीय समिती), पोखरा, नेपाळ (१३.६.२०२२)

६. आश्रमात आल्यावर अनुभवलेली सात्त्विकता मी इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवलेली नाही !

‘मी असा आश्रम पूर्वी कुठेही पाहिला नाही. आश्रमात आल्यावर मी जी सात्त्विकता अनुभवली, ती दुसर्‍या कोणत्याही ठिकाणी अनुभवली नसेल. आम्ही जसजसे आश्रमात फिरू लागलो, तसतशी माझ्या मनाची स्थिती पालटत गेली आणि ‘माझा भाव जागृत झाला.’

– श्री. जितेंद्र प्रकाश मोरे, अध्यक्ष, शिव आरती संघटन, नांदुरा, जिल्हा बुलढाणा. (१३.६.२०२२)

७. आश्रमात आल्यावर ‘मी माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले !

‘आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे’, असे मला वाटते. आश्रम पहातांना ‘या आश्रमाशी माझा जुना संबंध आहे’, असे मला वाटत होते. ‘मी माझ्या माहेरी आलो आहे, माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले.’

– श्री. मदन पांडुरंगजी तिरमारे, प्रचारक, श्री गजानन महाराज सेवा समिती, अमरावती, महाराष्ट्र. (१३.६.२०२२)

८. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे !

‘आश्रम पुष्कळ सुंदर, सुव्यवस्थित आणि सुनियोजित आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे. मला येथे प्रसन्नता जाणवली. साधकांचे आचरण पुष्कळ शुद्ध आहे.’

– रामप्रियाश्रीजी, कथा प्रवक्ता रामप्रिया फाउंडेशन अमर वक्ती, अमरावती, महाराष्ट्र. (१३.६.२०२२)

९. आश्रम पहातांना नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर मला स्वर्गीय अनुभूती आली !

‘वर्ष २०१९ मध्ये मला  आश्रम पहाण्याचे सौभाग्य मिळाले. त्या वेळी मी नामजप आरंभ केला होता. तेव्हा माझे अनुभव सर्वसाधारण होते; परंतु आज आश्रम पहातांना मी नामजप करण्याचा प्रयत्न केला आणि मला स्वर्गीय अनुभूती आली.’

– विश्व ज्योती नाथ, होजाई, आसाम. (१३.६.२०२२)

‘सनातनच्या आश्रमात काही दिवस राहिल्यावर मला घरी, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडून मिळणा-या प्रेमापेक्षा अधिक प्रेम मिळाले !’ – एक हितचिंतक (जानेवारी २०२२) 
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

 

 

Leave a Comment