संकटांमधून बाहेर पडण्यासाठी भगवंताची भक्तीच उपयोगी पडते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे – कठीण काळामध्ये भगवंतच आपले रक्षण करतो. तसेच तो आपण केलेल्या साधनेचे योग्य ते फळ देतो. भक्त प्रल्हाद, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना त्यांच्या भक्तीचे फळ मिळाले; कारण संकटांमधून बाहेर पडण्यासाठी भगवंताची भक्तीच उपयोगी पडते. येणार्या भीषण काळात तरून जाण्यासाठी कठोर साधना करण्यासह स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन करणे याला पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘येणार्या आपत्काळाच्या सिद्धतेसाठी पाटा-वरवंटा, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, जाते आदी गोष्टी वापरण्यास शिका’, असे आवाहनही केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !