पट्टणकुडी (कर्नाटक) येथे साधना शिबिर

पट्टणकुडी (कर्नाटक) – साधना आणि धर्माचरण यांनीच मनुष्यावर ईश्वराची कृपा होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती होते. मनुष्यजन्माचे सार्थक होते. त्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केली पाहिजे, तसेच भावी पिढीवर धर्माचे संस्कार केले पाहिजेत. त्यातूनच पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या २ जुलै या दिवशी पट्टणकुडी येथील श्री बिरदेव मंदिरात आयोजित साधना शिबिरात बोलत होत्या.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘मनुष्य आनंदात रहाण्याचा प्रयत्न करतो; पण बाह्य भौतिक सुखांमधून मिळणार्या आनंदात मर्यादा आहेत. खरा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे. त्यासाठी नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, स्वभावदोष-अहं निर्मूलन आणि निरपेक्ष प्रीती ही अष्टांग साधना करणे आवश्यक आहे.’’
आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी शिबिराचा उद्देश सांगितला, तर सौ. अंजली कोटगी यांनी सूत्रसंचालन केले. या शिबिरासाठी पट्टणकुडी आणि खडकलाट येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्या महिला आणि युवक असे ६५ धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. श्री बिरदेव मंदिराचे पुजारी श्री. सिद्धाप्पा वडगोले (सर) यांनी मंदिराचे सभागृह उपलब्ध करून देण्यासमवेतच सभागृहाची स्वच्छता करून दिली, तसेच बैठक आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय केली. (इतरत्रच्या मंदिर व्यवस्थापकांनीही श्री. सिद्धाप्पा वडगोले (सर) यांचा आदर्श घेऊन धर्मकार्यात हातभार लावावा ! – संपादक)
२. सनातन संस्थेद्वारे प्रकाशित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !