परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट

‘प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यात विघ्ने आणत, ऋषिमुनींना जिवे मारत, ऋषिमुनींच्या आश्रमातील गायींना मारून खात, हा इतिहास आपल्याला माहीत आहे. असुरांनी त्रेता आणि द्वापर युगांत देवतांना, तसेच प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला; पण देवता अन् अवतार यांंनी असुरांशी युद्ध करून धर्मविजय मिळवला, हे आपण जाणतोच. आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः जय हा देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणारे यांचा झाला आहे, हा इतिहास आहे. सप्तलोकांतील दैवी किंवा चांगल्या शक्ती आणि सप्तपाताळांतील मोठ्या वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे भूतलावर स्थुलातून होणारे प्रगटीकरण आजही दिसून येते.

 

१. कलियुगातील देवासुर लढा !

प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. सध्या कलियुगातही तो चालू आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातील लढा देऊन भारताच्या वायव्येकडून येणार्‍या वाईट शक्तींचे निर्मूलन केले होते. याविषयी त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. आजही भारतातील अनेक ज्ञात-अज्ञात संत, तसेच सनातनचे संत देवतांच्या पक्षातून लढत आहेत. ब्राह्मतेज, म्हणजेच साधनेचे बळ असलेलेच सूक्ष्मातून युद्ध लढू शकतात.

 

२. साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास आणि त्यांची कारणे

बर्‍याच साधकांना मागील १५ वर्षांपासून वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. हे त्रास मुख्यत्वे समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रसार करणार्‍या साधकांना होत आहेत. असे असले, तरी त्रास होणार्‍यांपैकी काही जण संतपदालाही पोचले आहेत. ‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्‍न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. ‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. याउलट सनातनचे साधक समष्टी साधना म्हणून समाजाला साधना करण्यासाठी उद्युक्त करून पृथ्वीवरील सात्त्विकता वाढवण्यासाठी आणि भूतलावर ‘ईश्‍वरी राज्य’, म्हणजेच ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत असलेल्या सात्त्विक लोकांचे राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ‘आसुरी राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या वाईट शक्तींच्या प्रयत्नांना खीळ बसते; म्हणून त्या समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांच्या कार्यात आणि सेवेत अनेक विघ्ने आणतात, तसेच साधकांचे शरीर, मन, कपडे, तसेच साधकांच्या वास्तूतील देवतांची चित्रे, वस्तू आदींवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात.’ पुढील छायाचित्रांतून ‘वाईट शक्ती कशा प्रकारे आक्रमण करतात ?’, हे प्रत्यक्ष पहायला मिळेल.

 

३. वाईट शक्तींनी तीव्रतेने आक्रमण केल्याने पूर्णपणे
विद्रूप झालेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे

येथे विद्रूप झालेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे दिली आहेत. ही छायाचित्रे ‘एका साधिकेकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक छायाचित्र अधिकाधिक विद्रूप होऊन वेगवेगळ्या वर्षी कसे दिसू लागले ?’, हे दर्शवतात. त्या ३ छायाचित्राचीं माहिती येथे दिली आहे.

अ. छायाचित्र क्र. १ – सप्टेंबर २०११

पहिले छायाचित्र (छायाचित्र क्र. १) सप्टेंबर २०११ मधील असून त्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खालच्या ओठाखाली उजव्या गालाकडील भागात गडद तपकिरी रंगाचे डाग दिसत आहेत. एकंदरितच या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा विद्रुप झालेला दिसत आहे.

आ. छायाचित्र क्र. २ – मार्च २०१२

२२.३.२०१२ या दिवशी, म्हणजे साधारण ६ मासानीं (महिन्यानीं) हे छायाचित्र परत पाहिले असता त्या छायाचित्रामध्ये पालट झालेला आढळून आला. या छायाचित्रामधील डागांचे प्रमाण आधीपेक्षा पुष्कळ वाढले आहे. छायाचित्र क्र. १ च्या तुलनेत या छायाचित्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कपाळ वगळता त्यांच्या संपूर्ण तोंडवळ्यावर डाग दिसत आहेत आणि त्या डागांची घनता (डेनसटी) वाढली आहे. तसेच त्यांच्या तोंडवळ्यावर फिकट जांभळ्या रंगाचे पसरट डाग दिसत आहेत. हे डाग त्यांच्या कपाळावर उजव्या बाजूस, दोन्ही डोळ्यांवर आणि उजव्या गालावर पुष्कळ प्रमाणात दिसत आहेत. त्यांच्या खालच्या ओठाखालील उजव्या गालाकडील भाग लालसर दिसत आहे. तसेच त्यांचा डावा गाल, हुनवटी आणि गळा यांवर एक फिकट जाभंळ्या रगांच्या डागांचा सर्पाकृती (नागासारखा) पट्टा दिसत आहे. एकदंरितच या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले याचां तोंडवळा अधिक विद्रपु झाला आहे.

इ. छायाचित्र क्र. ३ – नोव्हेंबर २०१७

१६.११.२०१७ या दिवशी, म्हणजे साधारण ५ वर्षे ७ मासानीं हे छायाचित्र परत पाहिले असता ते (छायाचित्र क्र. ३) छायाचित्र क्र. १ प्रमाणेच दिसू लागले आहे. या छायाचित्रातील डागांचा रगं पालटून गडद तपकिरी झाला आहे. तसचे या छायाचित्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या कानावरही डाग दिसत आहेत.

.

 

४. वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आक्रमण करण्याचे कारण

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांताप्रमाणे त्या व्यक्तीची आणि छायाचित्राची स्पंदने समान असतात. त्यामुळे वाईट शक्ती छायाचित्रावर आक्रमण करून त्या व्यक्तीच्या स्पंदनांवर आक्रमण करत असतात. याचा परिणाम त्या व्यक्तीवर प्रत्यक्षातही होतो. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणेही आक्रमण करून वाईट शक्ती एखाद्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात. या छायाचित्रांमध्येही वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आक्रमण करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच आक्रमण केले आहे. वाईट शक्ती किती हुशार आणि आपल्या शक्तीचा काटकसरीने उपयोग करणार्‍या आहेत, हे या आक्रमणांवरून लक्षात येते. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील शरिराच्या इतर भागांवर नव्हे, तर प्रामुख्याने तोंडवळ्यावरच आक्रमण केले आहे; कारण ‘तेथे आक्रमण केल्यास ते अधिक परिणामकारक आहे’, हे त्यांना ज्ञात आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांमध्ये झालेले अशा प्रकारचे अधिकाधिक त्रासदायक पालट आपत्काळाची वाढत चाललेली तीव्रता दर्शवतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

Leave a Comment