
चेन्नई – येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला. सत्संगाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. सुधा यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी रामनवमी आणि तमिळ नववर्ष यांविषयी महत्त्व सांगितले. या वेळी मेणबत्ती आणि तुपाचा दीप यांविषयी सूक्ष्म प्रयोग करण्यात आला. तुपाच्या दिपाकडे पाहून सर्वांना चांगले वाटले. त्यानंतर सौ. भुवनेश्वरी यांनी त्यामागचे शास्त्र सांगितले.
सौ. कल्पना बालाजी यांनी पंचतत्त्वांनुसार आध्यात्मिक उपाय याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या वेळी त्यांनी सात्त्विक नामपट्टी, अत्तर, कापूर, उदबत्ती, गोमूत्र, रिकामा खोका, सनातन प्रभातचा अंक यांचा आध्यात्मिक उपायासाठी कसा वापर करायचा, याविषयी सांगितले. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘कर्मफलन्याय’ याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. अनेकांनी साधना आणि कर्म यांविषयी शंकानिरसन करून घेतले. या सत्संगाला २८ जिज्ञासू उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !