परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये (संतांच्या हस्तलिखितांचे आध्यात्मिक महत्त्व)

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘संतांमध्ये चैतन्य असल्याने त्यांच्या हस्ताक्षरातही चैतन्य असते; म्हणून ते जतन केले जाते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कागदाच्या एका बाजूने असलेले हस्तलिखित आणि त्यांचे कागदाच्या दोन्ही बाजूंनी असलेले हस्तलिखित यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी १९.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये दर्शवणारी ‘पिप’ छायाचित्रे

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३, ४ आणि ५ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र  क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे  यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा,  गडद  हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (‘टेबला’वर) पांढर्‍या रंगाचा ठोकळा ठेवून वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर त्या ठोकळ्याला टेकवून कोरा कागद, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठकोर्‍या (दुसर्‍या बाजूने छापील मजकूर असलेल्या) कागदावर केलेले लिखाण (पाठकोर्‍या कागदावरील हस्तलिखित), त्यांनी कोर्‍या कागदावर एका बाजूने केलेले लिखाण (कागदाची दुसरी बाजू कोरी असलेले हस्तलिखित), त्यांचे कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेले हस्तलिखित (टीप १) अन् त्यांचे कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेले हस्तलिखित (टीप २), असे एकूण ५ घटक एकेक करून ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘कोरा कागद, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पाचही हस्तलिखिते यांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले ओळी नसलेल्या कोर्‍या कागदावर लिखाण करतांना कागदाच्या एका बाजूने खालपर्यंत लिखाण झाले की, तो कागद खालच्या बाजूने वरच्या दिशेला उलटा केल्यावर त्यावर लिखाण करतात. याचा अर्थ कागदाच्या एका बाजूला ज्या दिशेने लिखाणाचा आरंभ केलेला असतो, त्याच्या विरुद्ध दिशेने कागदाच्या दुसर्‍या बाजूला लिखाण केलेले असते. या हस्तलिखिताला ‘कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेले हस्तलिखित’, असे संबोधले आहे.

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले ओळी नसलेल्या कोर्‍या कागदावर लिखाण करतांना कागदाच्या एका बाजूने खालपर्यंत लिखाण झाले की, तो कागद वहीच्या पानाप्रमाणे आपल्या डाव्या बाजूला पलटल्यावर दुसर्‍या बाजूने पुन्हा वरपासून लिखाण करतात. या हस्तलिखिताला ‘कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेले हस्तलिखित’, असे संबोधले आहे.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. मूळ नोंद – मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ३१ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ६९ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. कोर्‍या कागदामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण थोडे घटणे

कोर्‍या कागदाच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ३२ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ६८ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत कोर्‍या कागदाच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २ टक्क्यांनी घटली होती. ही घट चैतन्याचा पिवळा रंग घटल्याने झाली होती. कोर्‍या कागदामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण थोडे घटले, असे यावरून लक्षात येते.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाठकोर्‍या (दुसर्‍या बाजूला छापील मजकूर असलेल्या) कागदावरील हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे घटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाठकोर्‍या (दुसर्‍या बाजूला छापील मजकूर असलेल्या) कागदावरील हस्तलिखिताच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ३६ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ६४ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ५ टक्के घटली होती.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण वाढणे अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखिताच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ७४ टक्के सकारात्मक स्पंदने आणि २६ टक्के नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या हस्तलिखिताच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ४४ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३७ टक्क्यांच्या) तुलनेत तो वाढला होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग (३ टक्के) दिसत होता.

थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या, तसेच कोर्‍या कागदाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याचे प्रमाण वाढले अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले, असे लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाठकोर्‍या (दुसर्‍या बाजूला छापील मजकूर असलेल्या) कागदावरील हस्तलिखितापेक्षा त्यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामधील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण १० टक्के अधिक होते, असे लक्षात येते.

२ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे घटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखिताच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ३३ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ६७ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २ टक्के घटली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे घटले, असे यावरून लक्षात येते.

२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच शुद्धता आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट लिखाण असलेल्या हस्तलिखिताच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत सकारात्मक स्पंदने ८१ टक्के आणि नकारात्मक स्पंदने १९ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या हस्तलिखिताच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने १२ टक्क्यांनी वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ४५ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३७ टक्क्यांच्या) तुलनेत तो वाढला होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग (१५ टक्के) पुष्कळ प्रमाणात दिसत होता.

थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या, तसेच कोर्‍या कागदाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच शुद्धता आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते. तसेच त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखितापेक्षा त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण १४ टक्के अधिक होते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. कोर्‍या कागदामध्ये सकारात्मक स्पंदने असण्यामागील कारण

कोर्‍या कागदावरील पांढरा रंग हा निर्गुणाचे प्रतीक आहे. त्या रंगाकडे दीर्घकाळ पाहिल्यावर मन निर्विचार होते. त्यामुळे चाचणीतील कोर्‍या कागदातून वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

३ आ. कोर्‍या कागदाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार व्यक्तीचे नाव किंवा लिखाण (शब्द), तिने स्पर्श केलेल्या वस्तू, तिचे छायाचित्र (रूप) यांमध्ये तिच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे उच्च आध्यात्मिक पातळीचे संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यामुळे त्यांचे हस्ताक्षरसुद्धा पुष्कळ चैतन्यमय आहे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितातून वातावरणात अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने (चैतन्य) प्रक्षेपित झाली.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखिताच्या तुलनेत त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितातून अधिक प्रमाणात उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखिताची दुसरी बाजू कोरी होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हस्तलिखितातून स्वाभाविकच चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन ते कमाल स्तरावर कार्यरत होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितातून अधिक प्रमाणात उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखिताच्या तुलनेत त्यांच्या पाठकोर्‍या (दुसर्‍या बाजूला छापील मजकूर असलेल्या) कागदावरील हस्तलिखितातून १० टक्के अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील, म्हणजे उच्च आध्यात्मिक स्तरावरील असल्याने त्यांच्या हस्ताक्षरामध्ये जेवढे चैतन्य आहे, तेवढे चैतन्य सामान्य व्यक्तीच्या मजकुरामध्ये किंवा छापील मजकुरामध्ये नसते. सामान्य व्यक्तीच्या लिखाणामध्ये सात्त्विकता असत नाही; कारण ती व्यक्ती साधना करणारी नसल्याने तिच्या स्वतःमध्येच सात्त्विकता नसते, तर तिच्या लिखाणात ती कुठून येणार ? छापील मजकूर आध्यात्मिक स्तरावरील नसल्यास त्यामध्येही सात्त्विकता नसते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिखाणासाठी पाठकोरा (कागदाच्या दुसर्‍या बाजूला छापील मजकूर किंवा इतरांचे लिखाण असलेला) कागद वापरल्यास त्या कागदामध्ये इतरांची स्पंदने येतात आणि ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्पंदनांएवढी सात्त्विक आणि चैतन्यमय नसतात. त्यामुळे त्या हस्तलिखिताची एकूण स्पंदने न्यून (कमी) होतात. याप्रमाणेच चाचणीमध्येही निदर्शनास आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जो पाठकोरा कागद लिखाणासाठी वापरला होता, त्या कागदावर एका वस्तूचे विज्ञापन (जाहिरात) छापलेले होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या त्या पाठकोर्‍या कागदावरील हस्तलिखितामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये घट झाली.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखितामधील सकारात्मक स्पंदनांमध्ये घट होण्यामागील कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कागदाच्या दोन्ही बाजूंना असलेले लिखाण एकमेकांच्या उलट-सुलट असल्यास एका बाजूने सुलट अक्षरे असलेल्या लिखाणातून प्रक्षेपित होणार्‍या चांगल्या स्पंदनांना दुसर्‍या बाजूने उलट अक्षरे असलेल्या लिखाणातून प्रक्षेपित होणारी स्पंदने अडथळा ठरतात; कारण त्या दोन्ही स्पंदनांच्या प्रवाहाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामध्ये असलेल्या सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना एकमेकांच्या उलट-सुलट असलेल्या हस्तलिखितामधील सकारात्मक स्पंदने १४ टक्के अल्प असल्याचे चाचणीतून दिसून आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोर्‍या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन कमाल स्तरावर कार्यरत झाल्याने त्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते. संतांच्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याने हिंदु धर्मात संतांची हस्तलिखिते जतन करण्याची परंपरा आहे. तो चैतन्याचा ठेवा आहे. संतांच्या हस्तलिखितांचे आध्यात्मिक महत्त्व या वैज्ञानिक चाचणीतून अधोरेखित होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२९.६.२०१८)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment