वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
वर्धा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पद्माकर नानोटी आणि योग वेदान्त समितीचे श्री. गुप्ता उपस्थित होते. धरणे आंदोलन झाल्यावर अपर जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. त्यांनीही निवेदन त्वरित पुढे पाठवण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !
फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !
सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !