व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून (मृत्यूकुंडलीवरून) तिला ‘मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकणे आणि तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचा बोध होणे
‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल.