नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळत नाही, याचे एक उदाहरण !
काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.