केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमान जयंतीच्या पावन दिवशी मल्याळम् भाषेत ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप घेण्यात आला. याला अनेक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !

हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

देशात कोरोनामुळे मागील १४ दिवसांमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘कोविड ट्रॅकर’नुसार देशात सध्या प्रतिदिन साधारणतः ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू होत आहे. ४ आठवड्यांआधी ही संख्या ७८७ च्या जवळपास होती. कोविड ट्रॅकरनुसार भारतात मागील १४ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ८२ टक्के वाढ झाली आहे.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सूत्रांचा स्वीकार करा ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्‍लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे.

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा आहार आणि आरोग्याची स्थिती लवकर पूर्वपदावर येण्यासाठीचे उपाय

सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत उत्तरेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत आणि महाबलाढ्य राक्षस त्यात विघ्ने आणत. ऋषिमुनींना जिवे मारत, तसेच गोमांसभक्षण करत. अशा प्रकारे प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो, तसाच तो कलियुगातही चालू आहे.

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

सध्या विविध ठिकाणी ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मानवाला किती आवश्यकता आहे आणि त्याचे मूल्य, हेच यातून दिसून येते. भविष्यात विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षणासाठी आता चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे.

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मला अचानक स्थुलातून जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत ऊर्जाशक्तीचा एक प्रवाह पाठीच्या मणक्यामधून सरळ वरच्या रेषेत गेला आणि तो प्रवाह मानेतच अडकला आहे.’ यापूर्वी मी असे कधी अनुभवले नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला आलेली ही अनुभूती ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची आहे. हठयोगी, ध्यानयोगी, शक्तीपातयोगी यांच्यासाठी ही उच्च स्तरावरील अनुभूती आहे; पण आपल्याला अशा कोणत्याही शक्तीच्या स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नाही.

कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.