चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जात असतांना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची सिद्धता केली आहे, असे दिसून येत आहे. चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक ‘पी.एच्.एल्.-३’ हे रॉकेट लाँचर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनची सरकारी दूरचित्रवाहिनी सीसीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे.

कोयना नगर (जिल्हा सातारा) येथील धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

हिमालयातील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात सिद्ध होत आहेत तलाव !

जगात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. भारतातील हिमालयातही हीच स्थिती आहे. यामुळे येथील तलावांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे.

गेल्या ६ वर्षांपासून चीनकडून जैविक शस्त्रांद्वारे तिसरे महायुद्ध करण्याचे नियोजन !

कोरोनाची मूळ उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे, हे सध्या लोक विसरले आहेत आणि चीनमध्येही याचा प्रभाव केव्हाच ओसरून चीनमध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे दळणवळण चालू आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील गुप्तचरांना चीनचा एक अहवाल सापडला आहे. १८ तज्ञांनी लिहिलेल्या या अहवालातून लक्षात आले आहे की, चीन ६ वर्षांपासून तिसर्‍या महायुद्धासाठी कोरोनासारखे जैविक शस्त्र बनवत होता आणि त्याने प्रत्यक्षात कोरोनाच्या माध्यमातून तिसरे युद्ध चालू केले आहे.

आशादायी पाऊल !

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्रामुळे कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर अभ्यास चालू केला असल्याची बातमी वाचणेसुद्धा आनंददायी आहे. यावर संशोधन करण्यासाठी सरकारकडून हृषिकेश येथील ‘एम्स्’ रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

तिसरी धोक्याची घंटा !

कोरोनाची दुसरी लाट एकप्रकारे सुनामीच आहे, याचा प्रत्यय प्रतिदिन येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण आणि तितकीच भयावह आहे; कारण या लाटेतील मृत्यूदर आधीच्या लाटेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘मृत्यूचे थैमान’ आदी शब्दही अपुरे पडतील. ती अजून संपलीही नाही आणि त्यात आता समोर येऊन ठेपली आहे तिसरी लाट !

कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे

​पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषध निर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याची सूची केंद्र सरकारकडून जारी !

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने काही पदार्थांची सूची ‘माय गर्व्हमेंट इंडिया’ या खात्यावरून ट्वीट करून शेअर केली आहेत.