परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो ! – ह.भ.प. गणेश महाराज, देवद, पनवेल
नामाने पवित्रता येते; नामदिंडी गावाचा परिसर पुनित करते. प्रत्येक युगात अधर्म वाढला की, ईश्वर अवतार घेतो; परंतु कलियुग चालू होऊनही ईश्वराचा अवतार अद्याप झालेला नाही. अवतार होण्यासाठी प्रत्येक युगात भक्तांनी प्रार्थना केली आणि मग अवतार झाले. आता विविध संत, संप्रदाय आदी नाम, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून कार्य करत आहेत; हे सारे अधर्माला थोपवून धरत आहेत.