पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या समस्येमुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. कित्येकजण प्रतिदिन पोट साफ होण्यासाठी औषधे घेतात. यांतील बहुतेक औषधांमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा उत्पन्न होतो. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या बळावत जाते.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

पुणे येथे श्री. अरविंद जोशी नावाचे विविध भारतीय उपचारपद्धतींचा अभ्यास करणारे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने या फुलांचे औषधी गुणधर्म शोधून त्यांचा अनेकांना लाभ करून दिला आहे. या फुलांपासून लाभ झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक लेख वाचून मी काही रुग्णांना ही फुले दिली, तर त्यांनाही पुष्कळ लाभ झाल्याचे लक्षात आले.

बहुपयोगी आणि औषधी उंबर (औदुंबर) वृक्ष

उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे..

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

टाकाऊ विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा !

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ?

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

धूमपान : श्‍वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !

‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.

दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?

पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.