राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते.

कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना त्यामागील आध्यात्मिक कारणांचा विचार होणे आवश्यक ! – डॉ. ज्योती काळे, सनातन संस्था

कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते, तोच दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. आता अन्य बुरशीजन्य आजारही येत आहेत. काही कालावधीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच वर्षभर वादळ, पूर अशी संकटांची मालिका चालूच आहे. कोरोनावर उपचार करतांना औषधे, ऑक्सिजन, लस हे सर्व उपलब्ध होऊनही लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनासह उपचार करणारे डॉक्टरही परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत.

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २६ मे या दिवशी, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कल्याण येथील ‘अदृश्य छाया’ या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात पार पडला. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती आवश्यक आहे.

५-६ वर्षांसाठी पाण्याची साठवणूक करण्याच्या अल्प दरातील पद्धतींची माहिती कळवा !

आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने माहिती आवश्यक आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्‍या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोना संसर्गाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. साधना वाढवण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ ही अमूल्य संधी साधकांना प्राप्त झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी विहंगम अध्यात्मप्रसार करून गुरूंची कृपा संपादन करूया. गुरूंनी सूक्ष्मातून सर्व कार्य केलेलेच आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत. गुरुपौर्णिमेला केवळ ६० दिवस शेष आहेत.

पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरणातील पालटांमुळे हा प्रकार चालू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे येतच रहाणार, अशी चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे, असे वृत्त दैनिक तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.

२६.५.२०२१ या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, बुधवार या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे १४ मेला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले.