गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कोरोना संसर्गाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. साधना वाढवण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ ही अमूल्य संधी साधकांना प्राप्त झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी विहंगम अध्यात्मप्रसार करून गुरूंची कृपा संपादन करूया. गुरूंनी सूक्ष्मातून सर्व कार्य केलेलेच आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत. गुरुपौर्णिमेला केवळ ६० दिवस शेष आहेत.