गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्‍या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोना संसर्गाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. साधना वाढवण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ ही अमूल्य संधी साधकांना प्राप्त झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी विहंगम अध्यात्मप्रसार करून गुरूंची कृपा संपादन करूया. गुरूंनी सूक्ष्मातून सर्व कार्य केलेलेच आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत. गुरुपौर्णिमेला केवळ ६० दिवस शेष आहेत.

पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरणातील पालटांमुळे हा प्रकार चालू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे येतच रहाणार, अशी चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे, असे वृत्त दैनिक तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.

२६.५.२०२१ या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, बुधवार या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे १४ मेला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले.

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता सापडला पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण !

काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातन संस्था निर्मित देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावल्यामुळे चांगले परिणाम लाभले !

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या प्रयत्नांनंतर औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातनच्या वतीने सिद्ध केलेले देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावण्यात आले. या नामजपातील चैतन्यामुळे तेथील वातावरणात पालट होत असल्याचे लक्षात येत आहे.

सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्ज ची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के !

पश्‍चिम महाराष्ट्रात २३ मे या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति् (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या धर्मध्वज स्थापना विधीची छायाचित्रमय क्षणचित्रे !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.