प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

विशिष्ट पद्धतीने केलेला नामजप आपणास कोरोना महामारीच्या काळात आपले मनोबल वाढवू शकतो; मात्र या नामजपात सातत्य असणे आवश्यक आहे. याचसमवेत मन स्थिर ठेवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत मनाला स्वयंसूचना दिल्याने मन स्थिर रहाण्यास साहाय्य होते, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी योगासने, प्राणायम, आयुर्वेदाचे उपचार इत्यादी प्रयत्न समाजातून होत आहेत. त्याबरोबर रोगप्रतिकारकशक्तीला पूरक असलेले आत्मबळवाढण्यासाठी साधनाच करावी लागते.

परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !

साधकांना ‘पुढे येणार्‍या आपत्काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण कसे होणार ?’, अशासारख्या अनेक गोष्टींची काळजी असते. त्या वेळी साधक हे विसरतात की, ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, तोच आपले रक्षण करणार आहे. आपण केवळ भगवंताच्या अनुसंधानात राहून भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते.

कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना त्यामागील आध्यात्मिक कारणांचा विचार होणे आवश्यक ! – डॉ. ज्योती काळे, सनातन संस्था

कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते, तोच दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. आता अन्य बुरशीजन्य आजारही येत आहेत. काही कालावधीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच वर्षभर वादळ, पूर अशी संकटांची मालिका चालूच आहे. कोरोनावर उपचार करतांना औषधे, ऑक्सिजन, लस हे सर्व उपलब्ध होऊनही लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनासह उपचार करणारे डॉक्टरही परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत.

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २६ मे या दिवशी, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कल्याण येथील ‘अदृश्य छाया’ या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात पार पडला. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती आवश्यक आहे.

५-६ वर्षांसाठी पाण्याची साठवणूक करण्याच्या अल्प दरातील पद्धतींची माहिती कळवा !

आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने माहिती आवश्यक आहे.