प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
विशिष्ट पद्धतीने केलेला नामजप आपणास कोरोना महामारीच्या काळात आपले मनोबल वाढवू शकतो; मात्र या नामजपात सातत्य असणे आवश्यक आहे. याचसमवेत मन स्थिर ठेवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत मनाला स्वयंसूचना दिल्याने मन स्थिर रहाण्यास साहाय्य होते, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.