वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या रूपात यज्ञकार्य करणारे समष्टी रत्न आम्ही गमावले ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्‍वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले; कारण त्यांचा आणि सनातन संस्थेचा अत्यंत घनिष्ट असा संबंध अन् संपर्क होता.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन

अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गवराम काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या ४ रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आला आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

‘मुंबई हाय’ परिसरात ‘अ‍ॅफकॉन्स’ या आस्थापनाकडून तेल विहिरींचे काम करत असलेल्या अरबी समुद्रातील जहाजांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे समुद्रातील ३ जहाजे भरकटली असून त्यांतील ‘बोर्ड हाऊसिंग बार्ज पी ३०५’ हे जहाज बुडाले असून त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे

बेळगाव येथील प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !

प.पू. डॉ. गिंडे महाराज गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.

बेळगाव येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज यांचा देहत्याग !

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘येत्या काळात अनेक वैश्‍विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे.

संतांनी एकामागोमाग एक देहत्याग करणे, ही आपत्काळाची नांदीच !

‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.