इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?

गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.

पतंजलि योगपीठ आणि गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करणाऱ्यां सनातन संस्थेचा सन्मान

येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक अन् समाजसेवक श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजलि योगपीठच्या वतीने ४ जून या दिवशी धार्मिक, सामाजिक, राष्ट्र यांच्या संदर्भात समर्पित कार्य करणाऱ्यां १२६ संघटनांचा सत्कार अन् सन्मान करण्यात आला.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.

देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.

आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या संतोष गरुड यांना आलेले अनुभव आणि साधनेची झालेली जाणीव

६.५.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवेच्या निमित्ताने दुचाकीने निघालो होतो. पर्वरी (गोवा) येथून पानवळ हे गाव ३८ कि.मी अंतरावर आहे. साधारण ३० कि.मी. अंतर पार केल्यानंतर पत्नी सौ. समृद्धी हिचा आश्रमातून भ्रमणभाष आला.

आपत्काळात बालकांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करण्याकडे लक्ष केंद्रित करणे !

मुले ही मोठ्यांपेक्षा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे त्यांच्यावर लगेचच होत असतात आणि कालांतराने या सर्वांच्या आहारी जाऊन मुले अयोग्य कृती करू लागतात.

पाणी हे जागतिक युद्धाचे कारण ?

आणखी पुढील ३० वर्षांत पाण्याची उपलब्धता इतकी न्यून होईल की, १/३ लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याने त्रासलेली (हवालदिल) असेल.

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. युरोपमधून विज्ञान भारतात आले, असे आपल्याला शिकवले जाते; पण ते योग्य नाही. आपल्याकडे लाखो वर्षांपूर्वीचा वैदिक विज्ञानाचा ठेवा आहे. प्राचीनता आणि चिरंतनता ही वैदिक विज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व विज्ञान प्रमाणांवर आधारलेले आहे.