हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.
जे कुणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होतील, त्यांचा निश्चित उद्धार होईल, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते १९ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त बोलत होते. या दिंडीस एक सहस्राहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.
हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.
या प्रसंगी श्री. बापू ढगे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर माझ्यात आमूलाग्र पालट जाणवत आहे. त्यामुळे समाजातील लोकांची नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.’’
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले.
भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.
या फेरीसाठी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.
कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !