वारुंजी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेचे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कांतावती देशमुख यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.