
सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – सध्या मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथील नटराज मंदिराच्या प्रांगणामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रवचनांमध्ये त्या बोलत होत्या. ‘धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मियांची स्थिती केविलवाणी झाली आहे. यासाठी जिज्ञासूंनी सनातनच्या साधना सत्संगांना यावे. तेथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल’, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाचा लाभ सातारा आणि पंचक्रोशीतील ५०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !