८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !

आज हिंदूंची केवळ भारतातीलच काही राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी केवळ दांडिया, होळी किंवा दिवाळी यांसारख्या सणांमध्ये रमून न जाता उर्वरित प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आपला देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर ‘प्रजासत्ताक हिंदु राष्ट्र’ बनेल.

Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !

लाठी, भाला, दांडपट्टा, कुर्‍हाडी, चक्रीपाश, तलवार, विटा आदी शिवकालीन शस्त्रकला या वेळी सादर करण्यात आल्या. अनेक शत्रूंशी एकाच वेळी कसे लढावे ? युवतीची छेड काढल्यास प्रतिकार कसा करावा ? याची प्रात्येक्षिकेही या वेळी सादर करण्यात आली.

Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !

आपले ध्येय काय आहे? केवळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हे आपले अंतिम ध्येय नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हे एक शरीर असेल, तर ‘रामराज्य’ हा त्याचा आत्मा आहे. आपल्याला भारताला पुन्हा एकदा ‘रामराज्य’ स्थापन करायचे आहे.

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !

दिल्लीतील भारत मंडपम् येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात’ भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला.

Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रकाशन !

१४ डिसेंबर या दिवशी महोत्सवात झालेल्या पहिल्या उद्बोधन सत्रामध्ये प्रारंभी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या सनातन संस्थेच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर

देश आज सांस्कृतिक पालटाची स्थिती अनुभवत आहे. सनातन धर्म हा कुणाच्याही विरोधात नाही; मात्र सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : राष्ट्र, संस्कृती व मंदिर रक्षण सत्र

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत; म्हणून मंदिरे व मंदिरातील परंपरांचे रक्षण होण्यासाठी ‘मंदिर महासंघा’ने १५ हजार मंदिरांचे संघटन केले आहे. त्यातून २ हजार ३०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

देशाच्या राजधानीत ‘सनातन राष्ट्रा’चा भव्य शंखनाद !

आज ‘ओटीटी’, सामाजिक माध्यमे आदींच्या माध्यमांतून अश्लिलतेचा प्रचार केला जात आहे. हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी देशातील शिक्षा पद्धती कठोर होणे आवश्यक आहे. भारत ‘विकृती सामृगी मुक्त’ देश व्हावा, असा संकल्प देशवासियांनी घ्यायला हवा, असे आवाहन श्री. उदय माहूरकर यांनी केले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या माध्यमातून सनातन परंपरा मजबूत करण्याचे कार्य होणार ! – वैभव डांगे, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’चे सदस्य आणि नागपूरच्या ‘आय.आय.एम्.’च्या बांधकाम समितीचे अध्यक्ष

सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ येत्या १३, १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी भारत मंडपम्, प्रगती मैदान, नवी देहली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपली सनातन परंपरा आणि संस्कृती समाजात पुन्हा एकदा सुदृढ आणि मजबूत करण्याचे, तसेच आपल्या परंपरांचे बीज नव्या पिढ्यांमध्ये रोवण्याचे कार्य केले जाईल.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘वन्दे मातरम्’ संदर्भात भव्य प्रदर्शन

‘वन्दे मातरम्’ने संपूर्ण भारताला राष्ट्रभावनेच्या सूत्रात बांधले. स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठीचे समर्पण आणि असंख्य क्रांतीकारकांच्या हृदयातील ऊर्जा या गीताने जिवंत केल्या आहेत. ही प्रेरणा आजच्या यु‍वापिढीपर्यंत पोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे’, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले.