सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘अग्रेसन पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ विषयावर पार पडली कार्यशाळा !
जयपूर (राजस्थान) – आपल्यातील दोषांचे अधिक्य आणि सद्गुणांचा अभाव आपले जीवन तणावग्रस्त बनवते. आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘अग्रेसन पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला शाळेचे सचिव श्री. कमल नानूवाला, प्राचार्या अमिता कुलवाल, श्री. राकेश गर्ग यांच्यासह शाळेतील अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !