अंनिस आणि मराठी विज्ञान परिषद यांचा दावा
हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी अंनिसची कोल्हेकुई !
जळगाव – १५ मार्च या ‘जागतिक अग्निहोत्रदिना’निमित्त जळगाव शहरात सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे अग्निहोत्र अवैज्ञानिक असून ‘याद्वारे आजार बरा होतो’, हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असे मत अंनिसच्या जळगाव शाखा आणि मराठी विज्ञान परिषद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, अग्निहोत्र प्रक्रियेत गायीचे शेण, तूप आणि चिमूटभर तांदूळ वापरतात. हे सर्व पदार्थ जैविक आणि सेंद्रिय आहेत. त्यात कार्बनी संयुगे असतात. अग्निहोत्रात या पदार्थांचे ज्वलन होते. ज्वलनासाठी ऑक्सिजनचा वापर होऊन कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसह अन्य प्राणघातक वायू बाहेर टाकले जातात. यातून वायूप्रदूषण होते. (केवळ हिंदु धर्मियांच्या प्रथा-परंपरांतूनच प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणार्या अंनिसला अन्य धर्मियांच्या सणांतून होणारे ध्वनी आणि जल प्रदूषण का दिसत नाही ? मशिदींवरील भोंग्यांच्या माध्यमातून होणार्या प्रदूषणाविषयी अंनिस का बोलत नाही ? – संपादक)

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !