प्रश्न : भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र होता. त्यामुळे ‘देवाचा पुत्र’ या नात्याने त्यालाही आपण ‘देव’ मानू शकतो का ?
उत्तर
भीमाला ‘देव’ मानणे, हे पुढील कारणांमुळे अयोग्य ठरते.
१. भिमात वायुतत्त्वाचे प्रमाण अधिक असणे
‘भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र होता’, याचा भावार्थ आहे, ‘भिमात वायुतत्त्व अधिक प्रमाणात होते.’
२. ‘लीला (चमत्कार) करणे’, या
देवतांच्या वैशिष्ट्याचा भीमामध्ये अभाव असणे
‘लीला (चमत्कार) करणे’, हे देवतांचे एक वैशिष्ट्य आहे. अनादी काळापासून देवता लीला करत आल्या आहेत, उदा. गौतमऋषींच्या शापामुळे शिळा बनलेली अहिल्या प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुन्हा मानवरूपात आली. द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्याचे पिता वसुदेव त्याला घेऊन यमुना नदी पार करण्यासाठी नदीत उतरले, तेव्हा त्या बाळकृष्णाच्या पदस्पर्शाने नदी दुभंगली आणि तिने वसुदेव यांना जाण्यासाठी वाट करून दिली. या पार्श्वभूमीवर भीमाचा विचार करता त्याने त्याच्या जीवनामध्ये अतुलनीय असे अनेक पराक्रम केले; परंतु श्रीराम, श्रीकृष्ण आदी देवतांसारख्या लीला केल्याचे दिसत नाही.
३. देवतांच्या पृथ्वीवरील पुत्रांमध्ये देवतांच्या
तत्त्वांचे प्रमाण पुष्कळ अल्प असल्यामुळे ते ‘देवता’ नसणे
देवता या मुळात मानवाप्रमाणे देहधारी नसून ती तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे अस्तित्व अनंत काळ असते. त्यामुळे कोणत्याही काळात भक्तांनी देवतांची उपासना केल्यास त्यांना अनुभूती येतात. त्या तुलनेत पृथ्वीवर (भूलोकात) जन्मलेल्या कुश-लव, भीम आदी देवतांच्या पुत्रांमध्ये त्या त्या देवतेच्या तत्त्वाचे प्रमाण पुष्कळ अल्प आणि मनुष्यत्व अधिक असल्याचे आढळते. परिणामी मनुष्याला असलेले उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे नियम देवतांच्या या पुत्रांनाही लागू होतात. यास्तव देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१६)
देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?
श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्या काही शंका आणि त्यांची उत्तरे
श्राद्ध संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे
परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !
विवाहाविषयी शंकानिरसन
मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन
एखाद्या कुटुंबात तीन चार पिढी मध्ये ब्रह्मचारी मुले म्हणजे ती मुले मंद असणे किंवा अपंग असणे किंवा चांगले असून सुद्धा लग्न न होणे असे असेल तर ते कोणता दोष असतो आणि त्यासाठी काय उपाय केला जातो या विषयी माहिती द्या.
नमस्कार
हे अतृप्त पूर्वजांच्या अवकृपेमुळे असू शकते. पूर्वजांसाठी वार्षिक श्राद्ध आणि पितृपक्षात महालय श्राद्ध केल्याने त्यांना पुढील गती प्राप्त करण्यात सहाय्य होते. तसेच तज्ञ ज्योतिषीला जन्मकुंडली दाखवून नारायण बाली, नागबली आदि काही विधी करावे का याचेही मार्गदर्शन घ्यावे. अध्यात्मिक स्तरावर उपाय म्हणून घरातील सर्वांनी नियमितपणे २-६ तास ‘श्री गुरुदेव दत्त’ चा नामजप करावा.
आपली
सनातन संस्था