
गोपींसारखी भक्ती करणे सातत्याने जमणे, हा साधनेतील शेवटचा टप्पा नसून तो व्यष्टी साधनेतील एक टप्पा गाठल्याप्रमाणे आहे. सध्याच्या काळात व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे ‘धर्मप्रसार करणे, समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्मपालन करायला सांगणे, त्याचप्रमाणे त्यांना साधना सांगून साधनेकडे वळवणे’ इत्यादी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.

सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने लहान असलेल्या, विशेष शिक्षण झालेले नसतांना आणि समष्टीचा काहीच अनुभव नसतांनाही श्रीकृष्णकृपेने त्यांना ही साधना चांगल्या रितीने जमू लागली आहे. अशा गोपीभावातील आणखीही काही साधिका धर्मकार्यासाठी सिद्ध होत आहेत.
(साधकांनो, आपणही आपल्यात गोपीभाव वाढवून राष्ट्र-धर्म कार्यासाठी सिद्ध होऊया !)
श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्या गोपी !
सनातनचे गोकुळ
गोपीभावातील कु. तृप्ती गावडे यांनी कृष्णभक्ती वाढवण्याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन
लहानपणी भातुकलीच्या खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे आठवणे आणि आता गुरूंची...
गोपीभाव आणि कृष्णभाव