श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे

सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

उज्जैन येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी, इंदूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, तर ग्वाल्हेर येथे समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन केले.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘सनातन संस्थे’च्या वतीने १३ जुलै या दिवशी पुणे येथील चिंचवड, कोथरूड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जुन्नर, शिरवळ, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

तणाव दूर करण्यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांवर परिणामकारक ठरणार्‍या गुणांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे आणि हे काम शिक्षकांच्या माध्यमातून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे सनातन संस्था शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैदेही पेठकर यांनी केले.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

नगर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

सध्याचा काळ वाईट आहे, याची पावले ओळखून सर्वांनी अध्यात्माची कास धरून सतत साधना करणे आवश्यक आहे, तरच या आपत्काळात भगवंत आपले रक्षण करेल, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक, नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

रायगड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

राष्ट्र घडण्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. देव, देश आणि धर्म यांच्या आड कुणी येत असेल, तर त्याचा बीमोड करायला हवा. यासाठी प्रथम आपण धर्माचे पालन करायला हवे. सत्याची बाजू सोडू नये. सत्य नसेल, तर ज्ञान फलित होत नाही.

पावसाळा आणि दूध

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’