वाईट शक्तीच्या आक्रमणामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

ज्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये अहं आणि भावनाशीलता आहे, त्या व्यक्तीकडे वाईट शक्ती आकृष्ट होतात. वाईट शक्ती व्यक्तीच्या मनात तिच्या जीवनाविषयी नकारात्मक विचार घालून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे काम करते.

ताण, निराशा, अपेक्षा आदी दोष घालवून सकारात्मकता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.

इच्छामरण (आत्महत्या) किंवा दयामरण, प्रायोपवेशन आणि संतांनी समाधी घेणे

रोगाने आजारी असलेल्या व्यक्तीने तिच्या इच्छेनुसार आत्महत्या करणे, याला ‘इच्छामरण’ म्हणतात. असाध्य रोगाने आजारी असलेला रुग्ण निर्णय घेण्यास असमर्थ असतांना कुटुंबियांच्या इच्छेनुसार डॉक्टरांनी आणलेल्या मृत्यूस ‘दयामरण’ म्हणतात. अशा प्रकारे मृत पावलेल्यांना मृत्यूत्तर सद्गती लाभत नाही; म्हणून धर्मशास्त्रांनी आत्महत्येचा निषेध केला आहे.

आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

ईश्‍वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्‍वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.

आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. क्षुल्लक कारणांनी १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याच्या या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे.

योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

गरीबात गरीब भारतियालाही आध्यात्मिक दृष्टीकोन माहीत असतात; उदा. ‘जीवनात येणारे दुःख हे प्रारब्धामुळे असून ते भोगून संपवण्यासाठी हा जन्म आहे.’ हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन सहनशीलता पुष्कळ प्रमाणात वाढवतो, सहन करण्याची क्षमता वाढवतो.

व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण आणि तिला लागणार्‍या पापाचे प्रमाण अन् संतांचा देहत्याग

सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.

मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !

अमेरिका किंवा पाश्चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चो-यामा-या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ? तसेच शस्त्रास्त्रांनी शक्तीशाली असणे म्हणजेही शांती साधणे नाही.

आत्महत्या करणारा निंदनीय ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, ‘बाबांनो, का जीव देता ? मरण तर ठरलेलेच आहे, मग मुद्दाम मरण का स्वीकारता ?

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

‘प्रतिदिन होणार्‍या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. ‘जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ साधनेने मात करता येते’, असे अध्यात्मशास्त्र सांगते.