अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.

काळानुसार साधना केल्यास वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात आनंदी रहाणे सहज शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो. आज बहुतांश जणांकडे पैसा असूनही मन:शांती नाही, अशी स्थिती आहे.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथील ग्रंथप्रदर्शन कक्षांचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथे सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला. याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोच्ची (केरळ) येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. संस्थेच्या साधिका सौ. शोभी सुरेश यांनी उपस्थित भक्तांना ‘पितृपक्ष आणि या काळात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व’ यांविषयी माहिती सांगितली.

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजेश पारधी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

मी सनातनच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण आश्रम बघून सनातनचे कार्य जाणून घेतले, तेव्हा ‘सनातनचे कार्य विशाल आणि अवर्णनीय आहे’, असे माझ्या लक्षात आले. याचे वर्णन करायला मी पामर आहे.

नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !

जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे !

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’

साधना हीच आनंदाची गुरुकिल्ली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा.

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट !

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणा-या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट या लेखात दिले आहेत.