पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत.

देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

आश्रमातील सर्व साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात’, हे पाहून श्री. मलिक यांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले. या वेळी श्री. मलिक यांनी त्यांच्या आस्थापनाच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची घेतली सदिच्छा भेट !

भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ‘कान्हा शांति वनम्’ नावाच्या ध्यानधारणेसाठीच्या जगातील सर्वांत मोठ्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सनातन संस्था सहभागी होणार आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

हा ग्रंथ वाचतांना मला प्रत्येक वाक्यातून विषय समजत होता आणि आनंद होत होता. या ग्रंथाचे वाचन करतांना वाचकांना आनंद होईल आणि विषय कळेल. अध्यात्मातील इतर ग्रंथ वाचतांना विषय समजण्यासाठी मन एकाग्र करावे लागते. अध्यात्मातील विविध विषय इतक्या सोप्या भाषेत मांडणारा हा ग्रंथ कल्पनातीत आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख अन् प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत रायपत यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्याचे प्रांत सहमंत्री श्री. मनोज पोतदार आणि श्री. रंगनाथ मेहतो हेही श्री. रायपत यांच्या समवेत होते.