पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !
‘माणसाच्या देहातील आत्माराम गेला, शरिरातील पंचमहाभूते निघून गेली की, त्या शरिराला ‘मढे’ म्हणतात. माणसाच्या आत पुष्कळ घाण आहे. विटाळाचा बनलेला हा देह मेल्यावर स्मशानभूमीमध्ये न्यावाच लागतो आणि नष्ट करावाच लागतो. मग तो गोरा असो कि काळा, राजा असो कि राणी असो ! सगळे जेवढे धरतीवर जन्माला आले, त्यांचे शेवटचे ठिकाण स्मशानभूमी !’
