साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आणि लाभ !

आपली साधना ही गुरुकृपायोगानुसार असल्याने साधनेमध्ये गुरुरूपातील संतांच्या मार्गदर्शनाला किंवा त्यांनी दिलेल्या साधनेच्या दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आहे. या संदर्भात काही सूत्रे पुढे दिली आहेत.

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातनच्या साधकांना व्यष्टी साधनेसमवेतच समष्टी साधनाही करायला शिकवतात. ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर साधनेची ही दोन्ही अंगे आत्मसात् करणे आवश्यक आहे; कारण ईश्वर हा सर्व जगाचाच कारभार बघत असतो.

सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्राचा भाग प्रकाशमान दिसणे आणि डोक्याच्या मागे प्रभावळ दिसणे यांसंदर्भात त्यांना स्वतःला अन् साधकांना आलेल्या अनुभूती

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्‍वरेच्छेने कार्य करून ईश्‍वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीच्या देहात दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘बर्‍याच वेळा लहान-सहान कृती करतांनाही साधकांतील अहं जागृत होतो. देवाकडे कर्तेपणा अर्पण करण्यासाठी, म्हणजेच स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी साधकांनी पुढीलप्रमाणे प्रयत्न करावेत.

दळणवळण बंदीमुळे जहाजांना बंदरांत थांबण्याची अनुमती न मिळाल्याने जहाजावरील कर्मचार्‍यांना झालेला त्रास आणि श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाने अनुभवलेली स्थिरता !

मला घरी जातांनाही अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’

पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भाववृद्धी सत्संगात पितृपक्षानिमित्त माहिती मिळाल्याने महालय श्राद्धाच्या दिवशी आलेली अनुभूती

सकाळी देवपूजा झाल्यावर मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला मोगर्‍याचा गजरा वाहिला होता. तो गजरा रात्रीही तसाच पूर्णपणे टवटवीत होता; मात्र तेथेच बाजूला ठेवलेला गजरा पूर्ण वाळला होता.

नायगाव (पालघर) येथील डॉ. संगीता म्हात्रे यांना श्री गणेशमूर्ती, देवघरात ठेवलेला कलश आणि विड्याची पाने यांमध्ये दैवी पालट झाल्याची आलेली अनुभूती

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आमच्या घरातील देवघरात श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर मला श्री गणेशमूर्तीच्या समोर लावलेले निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे मूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडलेले दिसले. डाव्या डोळ्यात ते अधिक स्पष्टपणे दिसत होते.

रात्रभर ५ फूट पुराच्या पाण्यात वहात असलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथाची सर्व पाने कोरडी

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावनामुळे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील श्री. गोरक्ष कारकिले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले, तसेच त्यांच्या पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे; मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरामध्ये नियमित पूजन करण्यात येणारा ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ ५ फूट पुराच्या पाण्यात रात्रभर वहात असूनही त्याचे एकही पान ओले झाले नाही.

श्रद्धा आणि संत वचनावरील दृढ विश्वास यांमुळे भगवंताचे दर्शन होणे

किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.