साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

ज्ञानोबा-तुकोबा यांचा वारसा असणारा, वारकर्‍यांच्या दिंड्या-पताका यांनी दुमदुमणारा, भजन-कीर्तनात दंग होणारा, गणेशोत्सवात लगबगून जाणारा, प्रदीर्घ संतपरंपरेचा वारसा असणारा महाराष्ट्र साधू-संतांसाठी असुरक्षित ठरतो कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, नांदेड येथील घटनांनंतर नुकत्याच सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे देशात महाराष्ट्राची अपकीर्ती होत असून अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास यापुढील … Read more

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात करावयाचा दत्ताचा सुधारित नामजप !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन करावयाचा सुधारित नामजप ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ असा आहे. हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

सनातनच्या वाढत्या कार्यात बांधकाम क्षेत्रातील सेवांसाठी स्थापत्य अभियंत्यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्‍या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे.

श्री. सुधाकर जकाते यांचा ८९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हृद्य सत्कार !

श्री. सुधाकर जकाते लष्करात मोठ्या पदावर कार्यरत होते. ९० व्या वर्षात पदार्पण करूनही ते माजी सैनिकांचे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक मंचाचे मार्गदर्शक आणि रुद्राभिषेक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सेवा करतात. ‘‘आता या सर्व व्यापातून सुटून केवळ भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली आहे’’, असे त्यांनी शेवटी सांगितले.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते. त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणारे यांची आवश्यकता !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

द्वारका आणि ज्योतिष पिठांचे शंकाराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीकाश्रम येथील ज्योतिष्पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागाने हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली आहे…

धार्मिक विधीच्या ठिकाणी आणि सात्त्विकता असलेल्या ठिकाणी सात्त्विक प्राण्यांनी उपस्थिती लावणे !

पूर्वीच्या काळी ऋषि-मुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषी-मुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. त्या वेळी जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगात पहायला मिळत आहे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !

अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांची हानी झाल्यामुळे पशूधनाचे उत्पादन अल्प होऊ शकते.