अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे’, या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन साधनावृद्धी सत्संग सोहळ्या’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. संगीता गुप्ता यांनी ‘नागपंचमीचे पूजन कसे करावे ?, नागदेवतेला प्रार्थना कशी करावी ?’ यांविषयीची माहिती सांगितली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् व्याख्याने यांद्वारे प्रसार !

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ जिज्ञासूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या १ मासापासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथे ‘ऑनलाईन’ ८९ प्रवचने घेण्यात आली. यांतून १ सहस्र ४८६ जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

आपल्याला समजलेली साधना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला समजलेली साधना आणि मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त समष्टी साधनेत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया, असे चैतन्यमय मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले.

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीयांच्या वतीने व्यापक प्रमाणात करण्यात आला ‘ऑनलाईन’ अध्यात्मप्रसार !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामाजिक माध्यमे यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला.

कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमान जयंतीच्या पावन दिवशी मल्याळम् भाषेत ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप घेण्यात आला. याला अनेक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !

हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.