सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला

काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी ‘विदर्भस्तरीय ऑनलाईन शिक्षक परिसंवाद’!

नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले. या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले.

कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर समाजासाठी उद्बोधक चर्चासत्र

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो.

‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी अन्य संतांनी दिलेले आशीर्वाद, तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा यांचे वाचन करण्यात आले. उपस्थित संत आणि मान्यवर यांनी सत्संगांमुळे समाजाला होणारे लाभ विशद केले.

पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे मुख्य कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी केले. त्या ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्गाच्या विशेष भागा’त बोलत होत्या.

महिलांनी धर्माचरण करण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे. त्यामुळे आपल्यामध्ये देवीचे शक्तीतत्त्व जागृत होऊन आत्मबळ वाढेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले.

तणाव निर्मूलनासाठी मनाचा अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.