
मुंबई – ४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह कोल्हापूर, अमरावती येथेही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एन्.डी.आर्.एफ.च्या) ९ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एस्.डी.आर्.एफ.च्या) च्या ४ तुकड्या सिद्ध ठेवण्यात आल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम चालू आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कराड-चिपळूण येथील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून वाहतूक अन्य मार्गाने हलवण्यात आली आहे.
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !