
‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’ सध्या कोरोना या जागतिक महामारीमुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत आणि किडामुंगीप्रमाणे लोक मरत आहेत. अशा भीषण काळातच विविध ठिकाणच्या संतांनी देहत्याग केल्याची वृत्तेही येत आहेत. गेल्या ८ दिवसांत देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढे सारणीत दिली आहेत.

संतांना आपत्काळात सूक्ष्मातून अधिक कार्य करता येते;
म्हणून काळाची आवश्यकता ओळखून ते देहत्याग करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आपत्काळाची ही नांदीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्काळाला तोंड देण्यासाठी सनातन संस्थेचे साधक समाजात जाऊन साधना करण्याविषयी जगभरातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करत आहे. ‘साधना केली, तरच आपण या आपत्काळात तरून जाणार आहोत’, हे लक्षात घेऊन आतापासूनच साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करा.’
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !